१८ मे २०२५ पासून राहू आणि केतू यांच्या राशी परिवर्तनामुळे कालसर्प दोष प्रभावी झाला आहे. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत स्थित असल्यामुळे सर्व ग्रह या दोघांच्या धुरीच्या एका बाजूला आले आहेत. जेव्हा असे घडते, तेव्हा कुंडलीत कालसर्प दोष तयार होतो, जो ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो. हा योग २८ जुलै २०२५ पर्यंत सक्रिय राहील. त्यानंतर मंगळाच्या कन्या राशीत प्रवेशामुळे त्याचा प्रभाव कमी होऊ लागेल.
हा योग जीवनात मानसिक ताणतणाव, अडथळे आणि अस्थिरता निर्माण करू शकतो. याकाळात चार राशींना विशेष सतर्क राहावे लागेल. या राशींच्या लोकांना मानसिक चिंता, आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि निर्णय घेणे कठीण होऊ शकते. अशा वेळी धार्मिक कार्य, मंत्रजप आणि संयमित आचरण यांचा आश्रय घेणे फायदेशीर ठरू शकते.
जाणून घेऊया त्या चार राशी कोणत्या आहेत, ज्या या योगाने विशेषतः प्रभावित होऊ शकतात:
मेष रास
मेष राशीच्या जातकांसाठी सध्या साडेसाती आणि केतूचा पाचव्या भावात गोचर आहे. त्यामुळे नवीन विचार आणि मार्ग स्विकारण्याची प्रेरणा मिळेल, पण संघर्ष आणि विरोधही वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये तणाव जाणवू शकतो. धोकादायक कामांपासून दूर राहा, मानसिक त्रास उद्भवू शकतो. शिक्षण अथवा नोकरीच्या कारणाने घरापासून दूर जावे लागू शकते. पचनाशी संबंधित अनेक त्रास संभवतात, त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
सिंह रास
सिंह राशीवर केतूचा प्रभाव आणि राहूची थेट दृष्टि आहे. त्याचसोबत मंगळाचाही गोचर आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा असंतुलित होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या, उरफटीने काहीही करू नका. वादविवाद टाळा. विजेचे उपकरण आणि धारदार वस्तूंशी व्यवहार करताना काळजी घ्या, मोठी जखम होण्याचा धोका संभवतो.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी साडेसातीचा अंतिम टप्पा चालू आहे आणि राहूचे गोचर देखील तणाव आणि अस्थिरता निर्माण करू शकते. गुरु ग्रह काही प्रमाणात संतुलन राखतील, पण घाईघाईत निर्णय घेणे टाळा. प्रेम जीवनात गैरसमज किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळा आणि आहारात काळजी घ्या.
मीन रास
मीन राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा आणि राहू-केतूचा गोचर अनेक अडचणी घेऊन येऊ शकतो. द्वादश आणि षष्ठ भावात ग्रहांची स्थिती अचानक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च वाढू शकतो. जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. वाहन चालवताना विशेष दक्षता बाळगा.
- महामृत्युंजय जप किंवा रुद्राभिषेक
भगवान शिव हे कालाचा अधिपती मानले जातात, म्हणून त्यांच्या पूजेमुळे कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. - दररोज किंवा सोमवारी 108 महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष लाभ मिळतो.
- रुद्राभिषेकानेही मनःशांती व आरोग्य सुधारते.
- नागदेवतेची पूजा व दूध अर्पण
दर सोमवारी किंवा नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेस दूध अर्पण करावे. - “ॐ नमो भगवते वासुकेशाय नमः” हा मंत्र 108 वेळा जपावा.
- नाग प्रतिमेवर पुष्प, कुश व दूध अर्पण करावे.
एखाद्या योग्य तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली घरात कालसर्प यंत्र स्थापन करून नित्य पूजा केली जाऊ शकते. सात्विक अन्न, संयमित आचरण, ब्रह्मचर्य पालन, नियमित ध्यान-धारणा व योगाभ्यास कालसर्प दोषाचे मानसिक परिणाम कमी करतात. तसेच काजळ, लोखंड, उडदाची डाळ, तिळ तेल, काळे वस्त्र, आणि नाग प्रतिमेचे दान गरजू किंवा ब्राह्मणास करावे. गरीब मुलांना अन्नदान करणे, वृद्धांची सेवा करणे शुभ मानले जाते, यामुळेही त्रास कमी होण्यास मदत होते.