महिन्याच्या सुरुवातीला सर्व काही सुरळीत असतं, पण महिनाअखेरीस खिशात पैसा उरलेला नसतो? बचतीचे अनेक प्रयत्न करूनही हातात पैसा टिकत नाहीये का? जर तुमच्याही आयुष्यात हे घडत असेल, तर ज्योतिषशास्त्रातील काही नियम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुम्ही कितीही कमावले तरी पैसा हातात राहिला नाही तर संपत्तीच्या वाढीस अडथळा येतो, आर्थिक समस्या वाढतात. अशात तुम्हाला ही वाटत असेल की माझ्या हातातून पैसा कसा निसटतो काही केल्या हे समजत नाही तर याचे एक कारण विचार न करता किंवा उधळपट्टी न करता खर्च करण्याची सवय असू शकते. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये पैसा हातात राहावा आणि खिसा आणि पर्स नोटांनी भरलेली राहावीत यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत.
भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, आर्थिक व्यवहार करताना काही विशिष्ट दिवस व वेळा टाळावेत, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थैर्यावर आणि मानसिक शांतीवर होतो. केवळ नियोजनच नव्हे, तर सूक्ष्म चुका आणि अवधान न ठेवलेली कृती यामुळेही आर्थिक संकट येऊ शकते.
जाणून घेऊया, कोणत्या दिवशी आणि वेळी आर्थिक व्यवहार टाळले पाहिजेत:
मंगळवारी कर्ज घेणे – कायमचं ओझं?
मंगळ ग्रहाचा संबंध संघर्ष, वाद आणि कर्ज यांच्याशी जोडला जातो. म्हणूनच मंगळवारी कर्ज घेणं, उधारी करणं किंवा कोणालाही पैसे देणं टाळावं. कारण मंगळवारी घेतलेलं कर्ज दीर्घकाळ टिकतं, फेडताना अडचणी येतात आणि मानसिक त्रास वाढतो. त्यामुळे मंगळवारी कोणताही मोठा आर्थिक व्यवहार टाळणं शहाणपणाचं.
शुक्रवारी पैसे देणे टाळा
शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी कोणालाही उधार पैसे देणं, म्हणजे आपल्या घरातून धन बाहेर जाण्याला आमंत्रण देणं होय. मान्यता अशी आहे की, शुक्रवारी दिलेले पैसे परत येणे कठीण होते आणि घरात आर्थिक स्थैर्य टिकत नाही. त्यामुळे शक्यतो शुक्रवारी कोणतेही आर्थिक व्यवहार टाळावेत.
संध्याकाळी पैसे देणे – नकारात्मकतेला आमंत्रण
संध्याकाळ हा संधिकाल मानला जातो. यावेळी घरात दिवा लावला जातो, प्रार्थना केली जाते आणि वातावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न होतो. संध्याकाळी उधारी, पैसे देवाण-घेवाण करणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी किंवा दुपारीच व्यवहार पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो.
काही उपयुक्त ज्योतिष टिप्स:
-
रात्री सूर्यास्तानंतर पैसे देवू नयेत.
-
महत्त्वाचे व्यवहार शक्यतो सकाळच्या वेळात पूर्ण करा.
-
देवघर नेहमी स्वच्छ ठेवा आणि दिवा लावा – हे लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयुक्त.
-
पैसे उधार घेणे/देणे शक्यतो गोपनीयतेत करा.
-
व्यवहार करताना सकारात्मक मनोवृत्ती ठेवा.