म्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने १२ वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले.
भारताने सातव्यांदा आयसीसी ट्रॉफीवर कोरलं नाव –
ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या जेतेपदाच्या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा करण्यात यश आले. लक्ष्याचा पाठलाग करताना, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली, या अंतिम सामन्यात टीम इंडियाला कर्णधार रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती आणि त्याची त्यांना गरज होती. संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आली नव्हती. मात्र, त्याने अंतिम सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावून सर्वांची मनं जिंकली.
रोहित-शुबमनने पहिल्या विकेट्ससाठी साकारली शतक भागीदारी
रोहितने ८३ चेंडूत सात चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर शुबमन गिल (३१) सोबत शतकी भागीदारी केली. परंतु, त्यानंतर भारताला दोन मोठे धक्के बसले. शुबमन गिलनंतर विराट कोहली (१) देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. लवकरच कर्णधार रोहितनेही आपली विकेट गमावली. त्यानंतर, श्रेयस अय्यर (४८) आणि अक्षर पटेल यांनी ६१ धावा जोडून संघाचे सामन्यात पुनरागमन केले. श्रेयस अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेल (२९) देखील लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुल (नाबाद ३४) आणि हार्दिक पंड्या यांनी संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. हार्दिक विजयापूर्वीच (१८) बाद झाला. पण केएल राहुलने (३४) रवींद्र जडेजासह (९) संघाला जेतेपद मिळवून दिल्यानतंर सुटकेचा नि:श्वास सोडला.
तत्पूर्वी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ गडी गमावून २५१ धावा केल्या होत्या. किवी संघाकडून मायकेल ब्रेसवेलने ४० चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि २ षटकार लागले. तर डॅरिल मिशेलने १०१ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आले. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जिथे वरुण चक्रवर्तीने १० षटकांत ४५ धावा दिल्या आणि कुलदीप यादवने १० षटकांत ४० धावा दिल्या. तर हार्दिक पंड्याने ३ षटकांत ३० धावा दिल्या आणि मोहम्मद शमीने ९ षटकांत ७४ धावा दिल्या.
या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यंग आणि ग्लेन फिलिप्सला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. या सामन्यात कुलदीप यादवनेही 2 विकेट घेतल्या. त्यानंतर भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने लॅथमची विकेट काढत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर वेगवान गोलंदाज मुहम्मद शमीने 1 विकेट घेतली. अशा पद्धतीने भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अखेर 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.
ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले. भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम खेळाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले असून, संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. भारतीय संघाच्या या विजयानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी ट्विट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.
गृहमंत्री अमित शहा :
इतिहास रचणारा विजय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी२०२५ मध्ये शानदार विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. तुमच्या उत्तुंग उर्जेने आणि मैदानावरील अजिंक्य वर्चस्वाने देशाला अभिमान दिला, क्रिकेटमधील उत्कृष्टतेसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
किती रोमांचक सामना! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडवर मेन इन ब्लूचा ऐतिहासिक विजय! २००२, २०१३ मध्ये तीनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एकमेव संघ म्हणून मेन इन ब्लू उंच उभा आहे आणि आता, १२ वर्षांनंतर, पुन्हा एकदा हा मुकुट आपल्या नावावर आहे!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्णधार रोहित शर्मा यांचे विशेष कौतुक केले आहे. या संपूर्ण मालिकेवर कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुरवातीपासून वर्चस्व राखले आणि अंतिमतः विजयाचा कळस केला. यासाठी भारतीय संघ कौतुकास आणि अभिमानास पात्र आहे. क्रिकेट हे भारतीयांचे वेड आहे. पण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेटप्रेमी भारतीय संघाचे चाहते आहेत. त्यांच्यासाठीही भारताच्या ‘यंग अँड एनर्जेटीक’ संघाची चिवट झुंज उत्कंठावर्धक ठरली. संघाने विजयश्री खेचून आणत क्रिकेट प्रेमींच्या आयुष्यात अवर्णनीय अशा क्षणांचे साक्षीदार होण्याची अविस्मरणीय पर्वणीच आणली. हा विजय नेत्रदीपक आणि क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, त्यासाठी आपण सर्व क्रिकेट प्रेमी भारतीय संघाचे आभारी राहू, अशा भावना व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक आदींचे अभिनंदन केले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली, त्याने आपल्या हुशारीने आघाडीवर नेतृत्व केले. गोलंदाजांनीही या प्रसंगी उल्लेखनीय कौशल्य आणि अचूकता दाखवत चांगली कामगिरी केली. हा संपूर्ण सांघिक प्रयत्न होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी :
टीम इंडियाने अंतिम सामना जिंकताच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत संपूर्ण देशाचे अभिनंदन केले आणि टीम इंडियाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, “छान सामना आणि उत्तम निकाल. चॅम्पियन्स ट्रॉफी मायदेशी परत आणल्याबद्दल टीम इंडियाचा अभिमान आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने शानदार खेळ केला. त्यांच्या शानदार कामगिरीबद्दल आमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.”