(रत्नागिरी)
जि .प .शाळा पूर्णगड नं.१ ता.जि. रत्नागिरी या शाळेत कार्यानुभव उपक्रमांतर्गत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात . आपल्या कोकणात प्रसिद्ध असलेले नारळ हे फळ पूर्वीच्या काळी कोयतीने सोलले जायचे. आत्ता मात्र नारळ सोलण्याचे यंत्र उपलब्ध झाले आहे. या यंत्राचा वापर करून नारळ कसा सोलावा याचे प्रात्यक्षिक शिक्षक व गावातील जाणकार व्यक्ती पापा मुरकर यांनी दाखवले. त्यानंतर मुलांनी शिक्षकांच्या देखरेखीखाली नारळ सोलण्याचे प्रात्यक्षिक यशस्वी केले.
‘मुलांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे ‘ यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते. शाळेच्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तारये मॅडम यांनी अभिनंदन केले आहे. तसेच असे जीवनोपयोगी उपक्रम शाळा राबवत आहे याबद्दल सर्व पालकही समाधानी आहेत. या उपक्रमाला मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक -पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.