(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व रत्नागिरी तालुका महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा संयुक्त जयंती दिन रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन शिवाजीनगर येथे आयुष्यमती ऋतुजा आंबुलकर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख वक्त्या भाग्यश्री पावरा व सेजल तांबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी विचार मंचावर रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सह सेक्रेटरी शशिकांत कांबळे, खजिनदार मंगेश सावंत महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा रसिका जाधव सेक्रेटरी, दिया कांबळे, सह सेक्रेटरी सान्वी कांबळे, सुत्रांचालिका करुणा प्रमोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवर, महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक तत्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर महिला मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवर, शाखा पदाधिकारी, उपसमिती पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या प्रतिमाना उपस्थित मान्यवर महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुणा पवार यांनी केले. त्यानंतर अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेत महिला मंडळाच्या वतीने कळझोंडी गावच्या नम्रता पवार, करुणा पवार, कोतवडे गावच्या समीक्षा कांबळे, रत्नागिरी आंबेडकरवाडी येथील श्रुती श्रीकांत जाधव, सृष्टी श्रीकांत जाधव रत्नागिरी पटवणे येथील सुनिता कांबळे, कोतवडे येथील अनुजा कांबळे त्यानंतर प्रमुख वक्त्या भाग्यश्री पावरा यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा प्रभावीपणे व अभ्यासपूर्ण आढावा घेतला तर प्रमुख वक्त्या सेजल तांबे यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला व अत्यंत प्रभावीपणे त्यांनी रमाईंचे कार्य उपस्थित महिलांसमवेत कथन केले. त्यानंतर रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे यांनी बौद्धजन पंचायत समिती व त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच सर्व महिलांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर यांनी भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज सावित्रीबाई फुले, रमाई, यांचे विचार कृतीत आणून आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन आयु. आंबुलकर यांनी केले. तसेच बौद्धजन पंचायत समितिचे अध्यक्ष प्रकाश पवार व उपाध्यक्ष विजय आयरे सर्व कार्यकारनिणे अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षा श्री.आंबुलकर यांनी आभार व्यक्त केले. रत्नागिरी मध्ये बौद्धजन पंचायत समिती, महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या या पहिल्याच मेळाव्याला महिलांनी अतिशय चांगली उपस्थिती दाखविल्याबद्दल सर्व महिलांचे त्यांनी कौतुक केले. संपूर्ण सभागृह महिलांच्या उपस्थितीने भरून गेल्याने पुरुष गाव शाखा पदाधिकारी सदस्य यांना सभागृहाच्या बाहेर बसावे लागले एवढी महिलांची उपस्थिती पाहून सर्वांनीच समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा पवार यांनी तर उपस्थित सर्व मान्यवर महिला मंडळ व जनसमुदाय या सर्वांचे आभार सेक्रेटरी दिया कांबळे यांनी मानले शेवटी शरणेत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.