(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील आगामी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता ही आरक्षण सोडत पार पडली. तालुक्यातील एकूण ९४ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४६ सरपंचपदे महिलांसाठी आरक्षित झाली असून, ग्रामीण भागात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक सशक्त करण्याकडे हा निर्णायक टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
या आरक्षणात अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी कशेळी व वाटद, तर नागरिकांचा मागासवर्ग स्त्री प्रवर्गासाठी गावडे आंबेरे, पाली, खरवते, रिळ, कापडगाव, हातखंबा, पोमेंडी खुर्द, साखर मोहल्ला, मिऱ्या, कोळंबे, जयगड, खालगाव आणि दांडे आडोम या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटातील स्त्री प्रवर्गासाठी काळबादेवी, देऊड, चांदेराई, तरवळ, शिवार आंबेरे, विल्ये, नाचणे नाणीज, बोंडे, टेंभे, टिके, सतकोंडी, वळके वेतोशी, वरवडे, गावखडी, खेडशी, मिरजोळे, खानू, कोतवडे, गडनरळ, मजगाव, लाजुळ, सैतावडे, फणसवळे, नेवरे, डोर्ले, पिरंदवणे, जांभरुण, जांभरी, चवे आणि चाफेरी या ३२ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गासाठी धामणसे, हरचेरी आणि कुरतडे या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी मेर्वी, कळझोन्डी, निवळी, उक्षी, पावस, चाफे, भाटये, चरवेली, नाखरे, आगर नरळ, मावळंगे, शिरगाव आणि पानवल ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वसाधारण गटातील आरक्षणामध्ये सड्या मिऱ्या, राई, गणपतीपुळे, गुंबद, चांदोर, निवेंडी, करबुडे, नेरूळ, बसणी, साठर, मालगुंड, कुवारबाव, वेळवंड, कासारवेली, तोणदे, सोमेश्वर, केळे, गणेश गुळे, पूर्णगड, कासारी, फणसोप, चिंद्रवली झरेवाडी, रानपाट, भगवती नगर, ओरी, भोके, गोळप, नांदिवडे, पोमेंडी बुद्रुक आणि कर्ला या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आरक्षणामुळे जिल्ह्यातील महिला नेतृत्वास नवे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून, महिलांचे ग्रामीण स्वराज्य स्थापनेतील योगदान अधिक प्रभावी होणार आहे.