(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती व सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने रयतेचा कृतीशील राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १३९ वा. जयंती दिन सामाजिक न्याय दिन म्हणून कळझोंडी पंचशील बुद्ध विहार येथे उत्साहात संपन्न झाला.
कविवर्य अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळाच्या सभापती नम्रता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी विचार मंचावर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती प्रकाश भा पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, सल्लागार किशोर पवार, सदस्य विजय के.पवार, नागेश पवार, महिला मंडळाच्या सेक्रेटरी रिना पवार, सल्लागार मयुरी पवार, सदस्या स्मिता पवार, सुप्रिया पवार यांच्यासह शाखेतील लहान थोर मंडळी उपस्थित होती.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सल्लागार किशोर पवार यांनी केले.मान्यवर पदाधिकारी अध्यक्ष अनिल पवार, सभापती नम्रता पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, सभापती प्रकाश पवार यांच्या हस्ते महामानव भ.गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्तबगार समस्त मानवी जीवन विकासमान उंचविणारे महान राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करण्यात आला.
त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
यानंतर झालेल्या अभिवादन सभेत सुप्रिया पवार, सांची पवार, रिना पवार, नम्रता पवार, संदीप पवार, किशोर पवार, प्रकाश भा.पवार, यांनी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.व अभिवादन केले.
अध्यक्षीय मनोगतात कवी अनिल पवार यांनी राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शेतीविषयक,धरणे बांधणी, सर्व जातींसाठी विद्यार्थी वसतिगृह बांधणी अशा विविध धोरणांचे स्पष्टीकरण करून मानवी समाजाला उन्नती करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये आरक्षण ठेवून शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी कृतिशील ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे सबंध देशांमध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम शाहू महाराजांनी केलं. याच शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला शुभेच्छा देऊन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सहकार्य केले होते. अशा या थोर कर्तबगार राजाला विनम्र अभिवादन करून बुद्ध शाहू फुले आंबेडकरी विचारधारा ही भारतीय संविधानात अंतर्भूत असल्याने समस्त मानवांची प्रगती होत असल्याचे गौरव उद्गार अध्यक्ष अनिल पवार यांनी काढले.
सूत्रसंचलन व आभार कमिटीचे सल्लागार किशोर पवार यांनी मानले. या दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्वाना गोड खाऊ वाटप करण्यात आला.