(तरवळ/ अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय मालगुंड या शाळेचा इ. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८.२४% टक्के लागला असून विद्यालयातून ईशान लतेश जोशी याने ९८ % गुण मिळवून सर्वप्रथम घेण्याचा बहुमान मिळविला आहे. त्याने मिळविलेल्या देदीप्यमान यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच प्रशालेतून द्वितीय क्रमांक इंद्रनील रमेश पाटील याने ९४.०० % तर सानवी कौस्तुभ केळकर ही ९२.४० % गुण मिळवून तृतीय आली आहे. विद्यालयातून ११४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता संपादन केली आहे. प्रशालेतील सर्व यशस्वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर, मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.