(मुंबई)
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य प्रशासनात उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा सहा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून प्रशासनात सातत्याने मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात येत आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल अधिक महत्त्वाची मानली जात आहे. गृह विभागाने या बदल्यांचे अधिकृत आदेश नुकतेच जाहीर केले.
बदल करण्यात आलेले आयपीएस अधिकारी आणि त्यांची नवीन पदस्थापना:
-
प्रभात कुमार – संचालक, नागरी संरक्षण (महाराष्ट्र राज्य, मुंबई)
-
प्रशांत बुरडे – पोलीस महासंचालक, लोहमार्ग
-
सुनील रामानंद – अप्पर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)
-
राजकुमार व्हटकर – अप्पर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल
-
के. एम. मल्लिकार्जुन – अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके
-
प्रवीण साळुंके – अप्पर पोलीस महासंचालक, महामार्ग सुरक्षा
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित विभागांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल, तसेच सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक सक्षम यंत्रणा उभी राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.