(रत्नागिरी)
तालुक्यात आज मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उष्मा जास्त जाणवत आहे. तर हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान गुजरातच्या विविध भागात ४५-५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वारे आणि जोरदार वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण यावेळी शेतातील पिकांचे पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान होऊ शकते.
एप्रिल, मे आणि जूनमध्ये देशातील तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. तर नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली येथे काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला.