( देवळे / प्रकाश चाळके )
ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! मंत्री महोदय उदय सामंत व आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून व अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रयत्नातून येळवण चाळकेवाडी येथे ₹22 लाखांच्या निधीतून कॉजवे बांधण्याचे विकासकाम सुरू झाले. या कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कॉजवे तयार झाल्यानंतर ग्रामस्थांना येण्या-जाण्याच्या अडचणींवर मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची होती, आणि ती प्रत्यक्षात आणता आली, याचा आनंद आहे, असे अपूर्वा सामंत म्हणल्या.
या कार्यक्रमास तालुका संघटक श्री. भरत लाड, उपतालुकाप्रमुख श्री. चंद्रकांत जानसकर, उपविभाग प्रमुख श्री. प्रल्हाद नारकर, श्री. महादेव गुरव, मा. उपसभापती श्री. उमेश पराडकर, सरपंच सौ. दिपाली दीपक जाधव आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. सुवर्णा पांचाळ उपस्थित होते.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अपूर्वा किरण सामंत यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळात आहे.बऱ्याच वर्षाच्या प्रतिक्ष्रेनंतर अपुर्वा सामंत यांच्या प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागले असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिल्या.