(रत्नागिरी)
रस्ते अपघातात वर्षाला अडीच लाख पेक्षा अधिक लोक ठार होतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, हेल्मेट, सीट बेल्ट तसेच योग्य ठिकाणी गाडी पार्क करणे याबाबतची जबाबदारी वाहन चालकाची आहे. बरेचसे अपघात हे मानवी चुकांमुळे होतात त्यामुळे रस्ते अपघात होऊ नयेत याची खबरदारी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन हातखंबा महामार्ग पोलीस केंद्राचे ए. एस. आय. श्री. राजेश पवार यांनी केले.
हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर आर्ट्स कॉमर्स ज्युनिअर कॉलेज हातखंबा येथे बुधवारी ( दिनांक २६ मार्च ) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रस्त्यावर घेऊन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी ए एस आय श्री सावंत, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. बी.डी. धोंडे सर, प्रा मनीषा मोरे शिक्षकेतर कर्मचारी श्री अवधूत शेटे उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. सुभाष रानमाळे यांनी केले. आभार प्रा. सौ. मनीषा मोरे यांनी मानले.