(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य शासनाने गोरगरीब पालकांच्या मुलींसाठी “लेक लाडकी योजना” सुरू केली आहे. त्या पूर्वी सुकन्या योजना सुरू होती. मात्र शासन बदलल्यानंतर योजना ही नव्या जोमाने नवीन कार्यपध्दतीने सुरू झाली. त्यामुळे ०१/०१/२०२३ ते ०१/०४/२०२३ अखेर जूनी योजना पूर्णत: बंदच होती. या मुदतीत जन्मलेल्या लाभार्थी मुली या योजनेपासून वंचितच राहिल्या आहेत.
या गोरगरीब मुलींना “लेक लाडकी” योजनेचा लाभ मिळावा म्हणून समाजसेवक एजाज इब्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उप.मुख्यमंत्री, बालविकास मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, आमदार किरण उर्फ भय्या सामंत, आमदार शेखर निकम तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्रव्यवहार करुन या लाभार्थी मुलींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी ०१/०४/२०२३ ऐवजी ०१/०१/२०२३ पासून योजनेचा लाभ मिळण्यास विनंती केली आहे.