(पनवेल)
पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या ५० हून अधिक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. यात संदीप शर्मा (वय ४८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हे बेशुद्ध झाले तर त्यांच्या पत्नी चारू शर्मा (वय ४४) आणि लक्ष पुरोहित (वय ९) जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, त्यात एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.
कर्नाळा अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढविला. हे सर्व पर्यटक मिळून कर्नाळा किल्ल्याकडे चालत जात होते. अभयारण्यातून वाट काढताना अचानक मधमाश्यांच्या थव्याने या पर्यटकांवर हल्ला चढवला. मधमाशांचा थवा मोठा असल्याने पर्यटक स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. यावेळी या पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला. त्याला इतर पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांनी जवळील रूग्णालयात दाखल केले तर बेशुद्ध अवस्थेत आलेल्या दोन पर्यटकांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
मधमाशांनी केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या पळापळीत पडून पुरोहित यांचा मृत्यू झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शिनी वर्तवली आहे. तर इतर जखमीनवर पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून, उपजिल्हा रुग्णालयात दाखल एका पर्यटकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर काही पर्यटकांवर नजिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार मुंबई तसेच नवी मुंबई येथून पर्यटना साठी आलेल्या काही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढविला. हे सर्व पर्यटक मिळून कर्नाळा किल्ल्याकडे चालत जात होते.
जुन्या मुंबई – पुणे महमार्गांवर असलेले कर्नाळा पक्षी अभय आरण्य पर्यटकांचे आवडते ठिकाण असून, या ठिकाणी शनिवारी, रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. शनिवारी देखील माटुंगा येथील व्ही जे टी आय येथील कॉलेजची सहा मुले ट्रेकिंगसाठी किल्ल्यावर आले असता त्यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला.