(रत्नागिरी)
रत्नागिरी टेंभ्ये गावचे सुपुत्र भूषणावह गौरवशाली विभूती मधील कै अनंतराव उर्फ भाऊ यांचे दिनांक 25/11/2024 रोजी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचे सामाजिक कार्य सदैव स्मरणात राहिल. पोलिस दलातील गौरवशाली कारकिर्दीमध्ये श्री. अनंतराव साळवी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पदक देवून गौरवण्यात आले होते. पंचक्रोशीतील प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक मदत कार्यात तसेच सुख दुःखात ते आवर्जुन उपस्थित रहायचे. त्यांनी टेंभ्ये हितवर्धक शाखेचे अध्यक्ष पद, टेंभ्ये हायस्कुलचे कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदे भुषवलेली होती. टेंभ्ये आडकरवाडी मध्ये त्यांनी शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक असे विविध उपक्रम राबविले.
भविष्यकाळातील पिढीने आदर्श ठेवावा व त्याचे गुण घेवुन काम करावे असे कार्य त्यांनी केले. ते अतिशय स्पष्ट वक्ते, शिस्तप्रिय, उत्तम मार्गदर्शक तसेच मनमिळावू स्वभावाचे होते.
त्यांचा दशक्रिया विधी टेंभ्ये आडकरवाडी येथे राहत्या घरी दिनांक 04/12/2024 रोजी व दिनांक 06/12/2024 रोजी बारा दिवसांचा विधी होणार आहे. त्यांच्या पवित्र मृतात्म्यास शांती लाभो ही समस्त साळवी परिवार आणि आप्तेष्टांकडून ईश्वरचरणी प्रार्थना…!